Civics Mahrashtra

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

Share

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या धान पिकाला बसला आहे.

गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, धान कापून आपल्या शेतामध्ये ठेवला होता. परंतु अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण धान आता खराब झाल्याचे चिन्ह दिसत आहे. हा कापून ठेवलेला धान पावसाच्या पाण्याने भिजला असल्यामुळे काळा पडणार आहे आणि त्यामुळे या शेतमालाला भाव सुद्धा कमी मिळणार आहे.

असे धान व्यापारी आणि शासकीय आधारभूत खरेदी केंद्र घेणार की नाही? याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून, आर्थिक भुर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

Related posts

हळदीच्या कार्यक्रमात लावलेल्या डिजेने घेतला तरूणाचा जीव

editor

माझ्यासोबत दर्शनासाठी आलेले कार्यकर्ते नव्हते तर ते वारकरी होते, माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही- संदिपान भुमरे

editor

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये 1333 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातूनही दिले मतदान प्रक्रियेचे धडे

editor

Leave a Comment