जळगाव
मे महिन्याच्या दुसरा आठवडा सुरू झाला आहे सर्वत्र उन्हाचा पारा चाळिशी पार गेलेला आहे दुपारी रस्ते उन्हामुळे शुकशुकाट दिसत आहे उन्हा संबंधित नागरिकांमध्ये तक्रारी वाढल्याने त्यामध्ये ताप, सर्दी -खोकला ,अंगदुखी, डीहाईड्रेशनचे रुग्णात वाढ झालेली आहे
चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष उभारण्यात आलेले आहे परंतु उष्माघाताचे गंभीर रुग्ण अजून पर्यंत रुग्णालयात दाखल झालेले नाही परंतु नागरिकांनी वाढत्या तापमाना पासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 4 बाहेर फिरू नये काही अर्जंट काम असल्यास त्या नागरिकांनी डोक्यावर टोपी रुमाल व पुरेसे पाणी पिऊनच घराबाहेर निघावे उन्हा संबंधित काही शरीराला त्रास जाणवत असेल तर तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा असे आव्हान चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केले आहे.
