Civics

मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे कर्मचारी सापडले पाणी टंचाईच्या विळख्यात

Share

मुंबई,३० मे :

धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे वर्क शॉप आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाणी टंचाईच्या विळख्यात सापडले असून त्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

मनमाडचे रेल्वे स्टेशन भुसावळ विभागात महत्वपूर्ण जंक्शन मानले जाते येथून रोज सुमारे १२५ गाड्यां धावतात त्यामुळे सर्वच प्लॉट फार्मवर प्रवाशांची मोठी गर्दी असते शिवाय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या ५ मोठ्या कॉलनी आहेत.येथे ब्रिटिश कालीन रेल्वेचे वर्क शॉप असून त्या भागात अनेक गाड्यांची साफसफाई करून त्यात पाणी भरले जाते या सर्वासाठी रोज सुमारे ३ लाख लिटर पेक्षा जास्त पाणी लागते. मात्र पावसा अभावी धरणाने तळ गाठला असून पाटोदा येथे असलेल्या साठवणूक तलावात देखील जेमतेम पाणी उरले आहे त्यामुळे प्रवाशांसोबत कर्मचारी आणि वर्क शॉप मध्ये पाणी पुरवठा कसा आणि कोठून करावा असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

Related posts

प्रत्येक आगारात साजरा होणार ” प्रवासी राजा दिन..! “-दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन…-१५ जुलै पासून सुरुवात..

editor

राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला ३५ रुपयांचा दर…,…! मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात केली घोषणा

editor

वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट

editor

Leave a Comment