Civics

मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे कर्मचारी सापडले पाणी टंचाईच्या विळख्यात

Share

मुंबई,३० मे :

धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे मनमाड रेल्वे स्टेशन सोबत रेल्वे वर्क शॉप आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाणी टंचाईच्या विळख्यात सापडले असून त्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

मनमाडचे रेल्वे स्टेशन भुसावळ विभागात महत्वपूर्ण जंक्शन मानले जाते येथून रोज सुमारे १२५ गाड्यां धावतात त्यामुळे सर्वच प्लॉट फार्मवर प्रवाशांची मोठी गर्दी असते शिवाय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या ५ मोठ्या कॉलनी आहेत.येथे ब्रिटिश कालीन रेल्वेचे वर्क शॉप असून त्या भागात अनेक गाड्यांची साफसफाई करून त्यात पाणी भरले जाते या सर्वासाठी रोज सुमारे ३ लाख लिटर पेक्षा जास्त पाणी लागते. मात्र पावसा अभावी धरणाने तळ गाठला असून पाटोदा येथे असलेल्या साठवणूक तलावात देखील जेमतेम पाणी उरले आहे त्यामुळे प्रवाशांसोबत कर्मचारी आणि वर्क शॉप मध्ये पाणी पुरवठा कसा आणि कोठून करावा असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

Related posts

जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून गुंदवली मेट्रो स्‍थानकाच्‍या काँक्रिट रस्‍त्‍याची दुरूस्‍ती

editor

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गर्भ-लिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ,स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्याचे दिले निर्देश

editor

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

Leave a Comment