Uncategorized

सॉल्ट रेस्टॉरंटच्या मालकाविरोधात दोन महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण

Share

मुंबई, ७ जून :

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.

शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केली आहे असा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे. येथील शेतीलगत आरसीसी बांधकाम करून भिंत उभारल्याने पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी चार फुटापर्यंत तुंबत असल्याने दोन वर्षांपासून ही शेतजमीन नापीक झाली आहे.

याविरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांनी दिलेले आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. जिव गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्या शिवाय आम्ही येथून हटणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिला आहे.

Related posts

रस्ते अपघातात जखमी झालेल्या जैन साध्वीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

editor

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षांसाठी २४ तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वन विभागाने तयार केले १७ कृत्रिम पाणवठे

editor

नागपुरात स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट; 6 जणांचा मजुरांचा मृत्यू 4 जण जखमी

editor

Leave a Comment