politics

उत्तर पश्चिमच्या जागेसंदर्भात कोर्टची लढाई लढणार -आदित्य ठाकरे

Share

उत्तर पश्चिममधे आमचा विजय, हा विजय सरकारी यंत्रणेचा वापर करून हिरवला

मुंबई प्रतिनिधी ,१७ जून :

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . उत्तर पश्चिम लोकसभा निकालात झालेल्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती . यावेळी शिवसेना नेते अनिल परब, अनिल देसाई, भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि उत्तर पश्चिमचे लोकसभा उमेदवार अमोल किर्तीकर उपस्थित होते .


यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की “एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीन ह्यावर देशभरात चर्चा सुरू आहे . मी आधीही म्हटलं होतं, EC म्हणजे ‘एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड’ कमिशन झाले आहे . संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली असती तर भाजपच्या २४० काय ४० जागाही आल्या नसत्या . अमोल कीर्तिकर ह्यांची सीट आम्ही जिंकलेली आहे . ह्या प्रकरणी निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे . अन्यथा कायद्याच्या सहाय्याने पाठपुरावा करून आम्ही हा विजय मिळवणारच ! असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला .

४ जूनला निकाल लागला यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला . मात्र निकाल संशयास्पद लावण्यात आलाय . निवडणूक प्रक्रिया पूर्ण पणे डावलण्यात आली ती १९ व्या फेरीनंतर . प्रत्येक फेरी नंतर कोणत्या उमेदवाराला किती मत मिळाली याची आकडेवारी प्रत्त्येक फेरी नंतर दिली जाते . १९ व्या फेरीपर्यत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं . आणि पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची tally करत असतात. RO नंतर आकडेवारी फायनल करतात . पण इथे RO आणि उमेदवारचा प्रतिनिधि यामध्ये अधिक अंतर ठेवण्यात आलं होतं, दूर बसवण्यात आलं होतं . मत मोजून झाल्यानंतर फॉर्म १७ c भरून द्यायचा असतो . ज्यामध्ये आपल्याला उमेदवाराला किती मत मिळाली हे द्यावं लागतं . पण फॉर्म अनेकांना दिले नाहीत , आमच्या tally मध्ये ६५० पेक्षा अधिक मिळाले आहेत .. ६५० मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या tally मध्ये येतोय . निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की आम्ही निकाल जाहीर करतोय . मात्र यामध्ये काहीच सांगण्यात आला नाही . आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलं तर दोन दिवसात देऊ असा सांगितलं . नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला . कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही, अस ते सांगतात .

निवडणूक केंद्रात मोबाइल वापरला गेला . त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे . १० दिवसानंतर गुन्हा दाखल झाला, या १० दिवसात मोबाइल बदलले गेले असा आमचा आरोप आहे . गुरव कोण आहे? या अधिकाऱ्याचा मोबाइल वापरला का ? सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे . हा विजय आमचा आहे, हा विजय सरकारी यंत्रनेचा वापर करून हिरवला गेलाय . RO चा इतिहास तपासा, किती भ्रष्टाचारच्या केसेस मध्ये त्या आहेत ? इलेक्शन कमिशन ने तक्रार घेतली पाहिजे . यावर चौकशी व्हावी . दोन दिवसात याचिका आम्ही कोर्टात दाखल करू .आम्ही निकाल जाहीर केला तेंव्हा तक्रार दाखल केली . आम्ही पीपल रिप्रेजेंस्टेशन ऍक्ट अंतर्गत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणे यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत . असे पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी तांत्रिक मुद्दे सांगितले

Related posts

India’s Foreign Minister Confronts Western Allegations and Influence

editor

नव्या जोमाने सगळ्या विषयांचे आत्मचिंतन करून भाजपा निर्विवादपणे महाराष्ट्रात महायुतीला यश मिळवून देईल

editor

राज्यसभेनंतर मंत्री पदासाठी देखील राष्ट्रवादीत रस्सीखेच

editor

Leave a Comment