Civics

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील नागरिकांनी पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव

Share

कल्याण,२५ जून :

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आहे. आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला.

जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले आहे. तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा करायला समास्या निर्माण होत असून एक-दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी पाणी पुरवठा अधिकाऱ्याने दिली आहे.

Related posts

झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पाच्या कामास विलंब करणा-या विकासकांवर कारवाई….! गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा इशारा

editor

दलाल खपवून घेतले जाणार नाहीत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

editor

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले

editor

Leave a Comment