Civics

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील नागरिकांनी पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव

Share

कल्याण,२५ जून :

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आहे. आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला.

जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले आहे. तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा करायला समास्या निर्माण होत असून एक-दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी पाणी पुरवठा अधिकाऱ्याने दिली आहे.

Related posts

गोरेगाव स्थित टोपीवाला महानगरपालिका मंडईतील गाळेधारकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश

editor

सरकार मधून मला मोकळा करा पक्षाकडे विनंती – देवेंद्र फडणवीस

editor

प्रिन्सटन टाऊन को-ऑप हौसिंग सोसायटीबाबत छायांकित प्रतीच्या आधारे मुद्रांक शुल्क करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

editor

Leave a Comment