Civics

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथील नागरिकांनी पाण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना घातला घेराव

Share

कल्याण,२५ जून :

डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आहे. आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला.

जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले आहे. तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा करायला समास्या निर्माण होत असून एक-दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी पाणी पुरवठा अधिकाऱ्याने दिली आहे.

Related posts

महायुतीच्या अपयशी कारभारामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच – विजय वडेट्टीवार

editor

मुख्यमंत्री सह्याद्रीतुन बाहेर पडताच रोखला ताफा

editor

भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक वर कारवाई, 1000 किलो प्लास्टिक जप्त, पाच हजार रुपये दंड वसूल

editor

Leave a Comment