Share
जालना, दि. २२ :
जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या आंदोलन केलंय. शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाही. वेळेवर नळाला पाणी येत नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, डेग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ आहे. त्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून नागरिकांना सुविधा पुरवण्याच्या अनेक सुचना गोरंट्याल यांनी आयुक्तांना दिल्या होत्या.
मात्र महापालिकेनं याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळं कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेत येवून ठिय्या दिला आणि महापालिकेची ग्रामपंचायत म्हणून घोषित करा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली. दरम्यान पुढच्या आठ दिवसात नागरिकांना सुविधा नाही पुरवल्या तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे.