Share
नवी मुंबई,२८ मे :
नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर, बामांडोगरी रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह बंद असल्याने येथील प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. रेल्वे स्थानक सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी स्वच्छता गृह मात्र लॉक करून बंद ठेवण्यात येत आहेत. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावरून हजारो प्रवाशी रोज प्रवास करतात परंतु स्वच्छता गृह मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. यात महिला प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.