Mahrashtra politics

स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडत आहेत…..?

Share

प्रदेश काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल….!

मुंबई प्रतिनिधी , ९ जुलाई :

मुंबई महानगर पालिकेचे कारभारी स्वतः मुख्यमंत्रीच असून चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सुत्रे असल्याने मुंबई व महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.महापालिकेच्या कार्यालयात दोन पालकमंत्र्यांची कार्यालये मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे खाण्यासाठी काढली आहेत का? असा संतप्त सवाल विचारून स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्री पावसावर फोडू नका,अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट हल्ला बोल केला.

आजच्या मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच पावसाने अत्यंत भयावह झाली असून मुंबई व उपनगरातील अनेक भाग पाण्याने तुडुंब भरले,रेल्वे व रस्ते वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. महानगरपालिकारेल्वे प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही.तर दुसरीकडे भ्रष्टाचारामुळे मुंबईकरांना शिंदे सरकारच्या पापाची फळे भोगावी लागत आहे.एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाते हे अत्यंत गंभीर असून पावसाने शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे पितळ उघडे पाडले असून महाभ्रष्टयुती सरकारने,चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया,असा गंभीर आरोपही पटोले यांनी केला.

महायुती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत पटोले पुढे म्हणाले की, मुंबईत झालेला पाऊस हा काही पहिल्यांदाच झालेला नाही.यापेक्षाही मोठा पाऊस मुंबईत झालेला आहे.पण आजच्या सारखी बिकट परिस्थिती त्यावेळी झाली नव्हती.राजकारणापेक्षा मुंबईच्या कामात जास्त लक्ष घातले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती.मुंबईत कोट्यवधी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधले पण त्यात खड्डे आहेत.कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली,अटल सेतूला भेगा पडल्या, हाच महायुतीचा विकास आहे का? अशी संतप्त विचारणाही पटोले यांनी केली.

मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली,नालेसफाई केली असा जो सरकारचा दावा आहे तो या पावसाने पूर्ण खोटा ठरवला.मुख्यमंत्री ग्रीन कार्पेटवर उभा राहून नालेसफाईच्या पाहणीचे बिभत्स प्रदर्शन करत होते. मात्र या पावसाने त्यांच्या इव्हेंटबाजीचा पर्दाफाश झाला असून नालेसफाईत सुद्धा हातसफाई करुन खिसे भरण्याचेच काम झाले म्हणून मुंबई तुंबली.एकाच पावसात विधिमंडळाचे अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करावे लागले हे या सरकारचा गलथानपणा व निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

मुंबईत पावसाने जनजीवन ठप्प केले असताना राज्याच्या अनेक भागात मात्र अद्याप हजेरी लावलेली नाही.अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. पाणीटंचाईची अवस्था अत्यंत भयंकर आहे.अनेक गावांत पाण्यासाठी माता भगिणींना पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. टँकरमाफिया आणि सरकारी अधिकारी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असून जनावरांच्या चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.सरकार फक्त मंत्रालयातून आदेश देते,पण प्रशासन खाली काहीच काम करत नाही,याकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार,अशीही विचारणा पटोले मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे.पोलिसांचा धाकच नसल्याने गुन्हेगार मोकाट आहेत. पुण्यातील पोर्श अपघातातून सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नसून वरळीत एका महिलेला भरधाव गाडीने चिरडले.ही कार शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची आहे.दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवल्याने एका निरपराध महिलेचा मृत्यू झाला.शिंदे फडणवीस सरकारला सत्तेचा माज आला असून मुख्यमंत्री म्हणतात कोणालाही पाठीशी घालणार नाही पण त्यांना कशाचेही गांभीर्य नाही. महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही. राज्यात अधिकारीही सुरक्षित राहिले नाहीत.पुण्यात वाहतूक शाखेच्या महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला, याला कारण सरकारचा प्रशासनातील हस्तक्षेप,पैसे घेऊन बदल्या करणे अशा प्रकारांमुळे प्रशासन काम करत नाही.आणि त्याचे परिणाम मात्र नाहक जनेतेला भोगावे लागत आहेत.याउपरही सरकारला जर जाग आली नसेल तर जनताच आता त्यांना घरी पाठवेल, असा इशाराही पटोले यांनी दिला.

Related posts

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांची भेट

editor

अध्यक्ष राजा माने यांची घोषणा,सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात होणार भव्य महाधिवेशन

editor

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून अंदाजे सरासरी  ५४.३३ टक्के मतदान झाले

editor

Leave a Comment