Mahrashtra कृषि

शेतातील धान्य खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

Share

गोंदिया :

गोंदिया जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हे खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान पीक हे लवकरात लवकर कापण्यासाठी म्हणून पारंपारिक पद्धतीने कापणी न करता हार्वेस्टर चा वापर करून शेतामध्ये कापणी करत आहेत.

जेणेकरून लवकरात लवकर कापणी करून आपला धान्य हे सुरक्षित ठेवता येईल आणि त्याकरिता शेतकरी आता अत्याधुनिक अशा हार्वेस्टर कडे वळले आहेत आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतातील धान पिकाची कापणी करत आहेत दर तासाला ४००० रुपये प्रमाणे हार्वेस्टरच्या खर्च शेतकरी करत असून या हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांना धान्य जमा करता येते आणि मजुरांचा त्रासही कमी होतो.

म्हणून ग्रामीण भागात, शहरी भागात सुद्धा या हार्वेस्टरला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पसंती देऊन शेतकरी हे लवकरात लवकर धान कापण्यासाठी आता या मशीनकडे वळले आहेत.

Related posts

कल्याणमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला जीवनदान

editor

नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या पदयात्रेचे आणि न्यायपत्राच्या योगदानाचे केले कौतुक

editor

सरकारमध्ये राहूनच आम्हाला आणि पक्षाला सहकार्य करावं; चंद्रशेखर बावनकुळे यांची देवेंद्र फडणवीस यांना विनंती

editor

Leave a Comment