Mahrashtra कृषि

शेतातील धान्य खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

Share

गोंदिया :

गोंदिया जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हे खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील धान पीक हे लवकरात लवकर कापण्यासाठी म्हणून पारंपारिक पद्धतीने कापणी न करता हार्वेस्टर चा वापर करून शेतामध्ये कापणी करत आहेत.

जेणेकरून लवकरात लवकर कापणी करून आपला धान्य हे सुरक्षित ठेवता येईल आणि त्याकरिता शेतकरी आता अत्याधुनिक अशा हार्वेस्टर कडे वळले आहेत आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतातील धान पिकाची कापणी करत आहेत दर तासाला ४००० रुपये प्रमाणे हार्वेस्टरच्या खर्च शेतकरी करत असून या हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांना धान्य जमा करता येते आणि मजुरांचा त्रासही कमी होतो.

म्हणून ग्रामीण भागात, शहरी भागात सुद्धा या हार्वेस्टरला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पसंती देऊन शेतकरी हे लवकरात लवकर धान कापण्यासाठी आता या मशीनकडे वळले आहेत.

Related posts

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

editor

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन

editor

जगेन तर मातंग समाजासाठी ….मरेन तर मातंग समाजासाठी ! ४३ वा क्रांतीचक्र मातंग परिवर्तन दिन

editor

Leave a Comment