Civics Mahrashtra

कासेगाव येथील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरु

Share

पंढरपूर :

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत असणाऱ्या सातवा मैल नजीक जलसंपदा विभागाचा नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, शाखा पंढरपूर फाटा क्रमांक १४ समोर कासेगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कासेगाव परिसरातील अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना थांबवले

परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत असल्याचे पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी एक ते तीन तारखेपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र, आज १३ तारीख उलटूनही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. फळबागेचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

Related posts

वासिंद रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

editor

बाणगंगा तलावाच्या परिसरात नुकसान करणाऱया कंत्राटदाराविरोधात

editor

आमदार कैलास गोरंट्याल यांचा कार्यकर्त्यांसह महापालिकेत ठिय्या, सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलाचा गोरंट्याल यांचा इशारा

editor

Leave a Comment