Civics Mahrashtra

कासेगाव येथील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आमरण उपोषण सुरु

Share

पंढरपूर :

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत असणाऱ्या सातवा मैल नजीक जलसंपदा विभागाचा नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, शाखा पंढरपूर फाटा क्रमांक १४ समोर कासेगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. कासेगाव परिसरातील अडीचशे एकर क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हा जलसंपदा विभागाच्या नीरा उजवा कालवा कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी लगेच मिळणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना थांबवले

परंतु वारंवार शेतकरी पाण्यासाठी अर्ज करत असल्याचे पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी एक ते तीन तारखेपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र, आज १३ तारीख उलटूनही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. फळबागेचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

Related posts

दुधाला हमीभाव देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांची केंद्राकडे मागणी

editor

Kejriwal Asserts Amit Shah Will Succeed Modi as PM; Amit Shah Refutes Claims

editor

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार

editor

Leave a Comment