Mahrashtra

राहुल गांधी यांनी अमेठी ऐवजी रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

Share
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि पक्षाचे निष्ठावंत केएल शर्मा यांनी शुक्रवारी रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.एकेकाळी उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या दोन मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांवरील उत्कंठा संपली काँग्रेसने शुक्रवारी सकाळी दोन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे
राहुल गांधींनी रायबरेली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दंडाधिकारी हर्षिता माथूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि रॉबर्ट वड्रा यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
उमेदवारी दाखल करण्यासाठी रायबरेली आणि अमेठी येथील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पूजा करण्याचे पूर्वनियोजित होते परंतु, राहुल गांधी, मोठ्या गर्दीमुळे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या अंतिम मुदतीमुळे ते करू शकले नाहीत, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. मात्र, कागदपत्रे सादर केल्यानंतर ते मध्यवर्ती पक्ष कार्यालयात पूजा करण्यासाठी परतले.राहुल यांनी पूजेनंतर प्रचाराची सुरुवात केली.
 फुरसातगंज विमानतळावर आगमनानंतर, प्रियंका गांधी गौरीगंज, अमेठी येथील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात  पोहोचल्या, तेथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर त्या रायबरेलीला रवाना झाल्या
के एल शर्मा यांनी अमेठीच्या जिल्हा दंडाधिकारी निशा आनंद यांच्याकडे नामनिर्देशनपत्रांचे चार संच सादर केले. अमेठीतील दोन गांधींपैकी एकाच्या संभाव्य नामांकन मिरवणुकीसाठी के एल शर्मा आधी सजलेल्या वाहनाच्या वरून पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना, प्रियंका म्हणाल्या, “तुम्ही सर्व के एल शर्मा यांना गेल्या 40 वर्षांपासून ओळखत आहात. या मतदारसंघातील प्रत्येक गल्ली, गाव, काँग्रेसचा कार्यकर्ता, समस्या त्यांना माहीत आहेत. त्यांनी 40 वर्षे तुमची सेवा केली आहे आणि मी त्यांना काम करताना पाहिले आहे. ही निवडणूक मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे. मला आशा आहे की तुम्ही अशाच पद्धतीने निवडणूक लढवून त्यांचा विजय निश्चित कराल. सत्य आणि सेवेचे राजकारण आम्हाला परत आणायचे आहे. 

Related posts

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक

editor

यवतमाळच्या कारागृहात राडा; तुरुंग अधिकारी, कर्मचारी यांना न्यायाधीन कैद्यांनी केली मारहाण

editor

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

editor

Leave a Comment