Share
यवतमाळ :
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील१५ जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटनातून १५ जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळं मटन सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे.
विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ६ महिला तर १३ पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.