कृषि

लसणाची फोडणी महागली, दर पोहचले तीनशे रुपयांवर

Share

नवी मुंबई,१४ जून :

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाच्या गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ही आवक पाच गाड्यांवर आली असून,पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्याने आवक मंदावली.याचा थेट परिणाम लासुणाच्या किमतीवर झाला असून,काही दिवसापूर्वी १८० रुपयांनी विकला जाणारा लसूण तीनशे रुपयांवर जाऊन पोहचला असून पुढील काळात पावसाचे प्रमाण वाढल्यावर दर आणखी वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत

मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश वरून येणाऱ्या लसणाची आवक पुढील काळात मंदावेल आणि दर ग्राहकांना परवडणारे नसतील,याच वाढलेल्या दराने खरेदी मंदावली असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याचेही लसूण व्यापारी सांगत आहेत.

Related posts

शेतातील धान्य खराब होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

editor

कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

editor

शेती संशोधन शेतकऱ्यांपर्यंत त्याच्याच भाषेत पोहचायला हवे – पद्मभूषण प्रा. जे. बी. जोशी

editor

Leave a Comment