Civics Mahrashtra

येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई, दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतेय

Share

येवला ,२७ मे :

येवल्या तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणीटंचाईची दाहकता देखील वाढतांना येवला तालुक्यात दिसून येत आहे. जवळपास ५८ गावे व वाड्या वस्त्यांवर ५७ टॅंकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आहे.टँकर आल्यावर हातातले कामे बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे. तरी शासनाने टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.

Related posts

लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल -सभापती प्रा. राम शिंदे

editor

भाजपला केवळ दोन हजार मतांच्या फरकाने १६५ जागा ; माजी आमदार अनिल गोटे यांनी केले हे विश्लेषण

editor

रस्ते अपघातात जखमी झालेल्या जैन साध्वीच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून

editor

Leave a Comment