Civics Mahrashtra

येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई, दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतेय

Share

येवला ,२७ मे :

येवल्या तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणीटंचाईची दाहकता देखील वाढतांना येवला तालुक्यात दिसून येत आहे. जवळपास ५८ गावे व वाड्या वस्त्यांवर ५७ टॅंकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आहे.टँकर आल्यावर हातातले कामे बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे. तरी शासनाने टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.

Related posts

कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी

editor

अदानीपासून मुंबईला वाचवा….? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

editor

३०० मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार – विजय वडेट्टीवार

editor